पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर म्हणजे तोरणागड म्हणजेच प्रचंडगड. हा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले असं म्हणतात, म्हणून १२ महिने २४ किल्ले या मोहिमेला पहिले तोरण याच किल्ल्याचे. पुण्यापासून साधारण ६० किमी अंतरावर वेल्हे तालुक्यात असलेला हा किल्ला.
पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या परिसरात असे काही किल्ले आहेत. ज्यांची नावे देखील आपणास माहीत नाहीत. परंतु या किल्ल्यांवर इतिहासात पराक्रमाच्या गाथा लिहिल्या गेलेल्या आहेत. भोर पासनू अगदी हाकेच्या अतंरावर असलेला, परंतु आजही सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील रायरेश्वराशेजारी भग्न अवथेत शांतपणे उभा असलेला ...
सह्याद्रीच्या डोंगररांगेतल्या रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे ...
रायरेश्वर हे सह्याद्री डोंगररांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. या पठारा वरील रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे...
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले तसेच याचं बांधकाम मराठेशाही च्या शेवटच्या म्हणजे आताच्या अगदी अलीकडच्या ...
पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. समोरच ३-४ कि.मी अंतरावर तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला "तिकोना" असे नाव पडले आहे . तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु ...